
नवी दिल्ली: राजीनामा नाट्याने राजधानीतील राजकीय वातावरण तापविल्यानंतरही कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकार आणि काँग्रेस यांच्यावरील दबावाची टांगती तलवार कायम ठेवली आहे. पवार यांच्या नाराजीचे नाट्य राजधानीत अजूनही सुरूच आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांने नाकदुर्या काढूनही पवारांचा क्रोधाग्नी शांत झालेला नाही.
