अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर ठाकरे सरकारवर संतापली कंगना


मुंबई – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली. अर्णब गोस्वामी यांच्या यावेळी घरी अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाला. पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर अर्णब गोस्वामी यांनी आरोप केले आहेत. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर ठाकरे सरकारवर निशाणा साधत कंगनाने आक्षेपार्ह उल्लेख केले आहेत.


एक व्हिडीओ कंगनाने ट्विट केला आहे. अजून किती घरे तुम्ही तोडणार आहात? त्याचबरोबर अशी किती तोंडे बंद करणार आहात? अशी विचारणा कंगनाने ठाकरे सरकारला केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला मला विचारायचे आहे, अर्णब गोस्वामी यांच्या घरात घुसून तुम्ही मारले आहे, केस ओढले. अजून किती घरे तुम्ही तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात?.

यावेळी पुन्हा एकदा सोनियासेना उल्लेख करत कंगनाने, किती तोंडे सोनियासेना बंद करणार आहात? ही तोंडे वाढतच जाणार आहेत. किती जणांचा बळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील, असे म्हटले आहे. पेंग्विन म्हटल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखे दिसतात तर तेच म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखे काम केले तर पप्पूच म्हणणार ना..सोनियासेना म्हटल्यावर राग का येतो. तुम्ही आहात सोनियासेना, असेही कंगनाने पुढे म्हटले आहे.