राज्य सरकारने बदलले ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष


मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलल्याची माहिती दिली आहे. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही असा जिल्हा ऑरेंज झोन तर 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही असा जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर ज्या जिल्ह्यात 15 हून अधिक रुग्ण आहे, तो जिल्हा रेड झोन असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



राज्यातील जिल्ह्यांची कोरोना व्हायरसच्या प्रभावानुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याआधी रुग्ण संख्या हा प्रमुख निकष होता. त्यानुसार 15 पेक्षा कमी रुग्ण म्हणजे ऑरेंज झोन आणि रुग्ण नाही म्हणजे ग्रीन झोन असे निकष होते. परंतु आता हा झोन ठरवण्याचा निकष किती दिवसात रुग्ण आढळले यावर अवलंबून असेल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment