राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान मोठी वाढ होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज ; आरोग्य मंत्री


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान मोठी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तरी राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात तयारी झाली असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय पातळीवरही प्रयत्न केले जात असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. येत्या 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान स्पाईक येण्याची शक्यता आहे. पण आरोग्य यंत्रणेची त्यासाठीची सगळी तयारी झाली आहे. पण यासोबतच महाराष्ट्रातील जनतेने स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असेही आवाहन राजेश टोपे यांनी केले.

आता ऑक्सिजन स्टेशन कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार असल्यामुळे रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये, म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Leave a Comment