दिलासादायक बातमी…! राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा वेग मंदावला


मुंबई : कंटेनमेंट कृतीआराखड्याची महाराष्ट्रात प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्यामुळे कोरोना ग्रस्तांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून साडेपाच दिवसांवर आला आहे. जेवढा हा कालावधी वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल. पूर्वी राज्याचा कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग हा दोन दिवस होता, त्यानंतर तो साडेतीन दिवस झाला आणि आता सध्या साडेपाच दिवस एवढा झाला आहे. हा दुपटीचा वेगाचा कालावधी जेवढा वाढेल तेवढी रुग्णसंख्या कमी होईल.

कोरोनाग्रस्तांचा राज्यातील मृत्यूदर देशात जास्त असून त्यातील 83 टक्के मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत. तज्ञांची समिती कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णासाठी तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाईल. त्यासाठी समितीतील तज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना कळविण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यात झालेल्या चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. पुल टेस्टींग, रॅपीड टेस्टींगसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) परवानगी मागितली आहे.

Leave a Comment