दहावीचा उर्वरित एका पेपरची तारीख 31 मार्चनंतर होणार जाहीर


मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मोठे निर्णय घेतले आहेत. त्यातच दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोमवारी शेवटचा पेपर होता, पण सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी होणारा पेपर आता थेट 31 मार्च नंतर होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या पेपरच्या परीक्षेची तारीख 31 मार्चनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्च रोजी विद्यार्थ्यांसंदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली होती. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची, तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील, अशी घोषणा त्यांनी केली होती. पण नियोजित वेळापत्रकानुसारच दहावीची परीक्षा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता राज्यातील परिस्थिती आणि कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेली वाढ पाहता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा उर्वरित एक पेपर पुढे ढकलला असून तो 31 मार्चनंतर होणार असल्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment