भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती


पर्यावरण अनुकूल कार्सची बाजारपेठ दिवसेंदिवस मोठी होत असून प्रदूषण टाळण्यासाठी कोणत्या प्रकारच्या इंधनाचा वापर करता येईल याचा शोध भारत आणि इतर देशांतील ऑटोमोबाईल कंपन्या घेता आहेत. इंधनचा खर्चही यामध्ये महत्वाचा आहे. अशातच स्वस्त इंधनावर चालणाऱ्या कारची निर्मिती मध्य प्रदेशमधील एका मेकॅनिकने केली आहे. विशेष म्हणजे पाणी आणि कार्बाइडपासून या कारमधील इंधन हे बनवण्यात आले आहे. या मेकॅनिकचे नाव मोहम्मद रईस मेहमुदी मरकानी असे आहे.

गेली 35 वर्षे मोहम्मद गॅरेजमध्ये काम करत आहेत व अशा प्रकारच्या इंधन निर्मितीचा प्रयत्न गेले सहा महिने ते करत आहेत. स्वतःच्या वर्कशॉपमध्ये केलेल्या अनेक प्रयोगानंतर मरकानी यांनी या इको फ्रेंडली कारची निर्मिती केली. यासाठी त्यांनी त्यांच्या मारुती 800 गाडीवरच वेगवेगळे प्रयोग केले. या कारमधील इंधन हे फक्त 10 ते 20 रुपये प्रति लिटर एवढे आहे. ही कार या इंधनावर 50 ते 60 किमी प्रतितास या वेगाने चालते.

अॅसिटिलीन गॅसवर ही कार चालते, जे कॅल्शियम कार्बाइड आणि पाणी यांदरम्यान घडवल्या गेलेल्या रासायनिक क्रियेपासून बनवले जाते. या गॅसचा वापर खनिजेसाठी वेल्डिंग आणि पोर्टेबल लाइटिंगसह अनेक औद्योगिक उद्दीष्टांसाठी केला जातो. मरकानी याबाबत म्हणतात, भारतीय बाजारात पेट्रोलवर 70 रुपये प्रति लिटर खर्च करणाऱ्या भारतीयांसाठी हे इंधन फार मोठी मदत असणार आहे. या गाडीत असणारे डिजिटल तंत्रज्ञान या गाडीचे वैशिष्ट आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारेही ही गाडी ऑपरेट करू शकणार आहात.

Leave a Comment