सापाच्या जीभेचा भाग दोन हिश्श्यात का विभागले असतो ?

snake
साप बघितल्यानंतर आपल्यापैकी बहुतेकांची चिडीचुप होते. पण तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीतरी साप बघितलाच असेल आणि तुम्ही हे पण जानत असाल की सापाची जीभ ही दोन भागात विभालेली असते. पण तुम्ही यामागचे कारण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? सापाच्या जीभ दोन भागात विभागल्या जाण्यामागे एक गुढ रहस्य दडले आहे, ज्याचा उल्लेख महाभारतात केला गेला आहे. महर्षि व्यास द्वारा लिखित महाभारतमध्ये सापाच्या जीभ दोन भागात विभागल्या जाण्याबाबत एक कथा सांगण्यात आली आहे.
snake1
महाभारतानुसार, महर्षि कश्यपच्या 13 पत्नी होत्या. यापैकी कद्रू देखील एक होती. सर्व साप कद्रूचे वंशज आहेत. त्याच वेळी महर्षि कश्यप यांची दुसरी पत्नी जिचे नाव विनाता होते, जिचा पुत्र पक्षाराज गरुड आहे. एकदा, महर्षि कश्यप यांच्या काद्रू आणि विनाता या दोघींनी एक पांढरा घोडा पाहिला. त्याला पाहून कद्रु म्हणाली की या घोड्याची शेपटी काळी आहे आणि विनीता म्हणाली की पांढरी आहे. यावरुन त्या दोघींनी पैज लावली.
snake2
तेव्हा कद्रूंनी आपल्या नाग मुलांना सांगितले की त्यांनी आपला आकार छोटा करुन घोड्याच्या शेपटीशी जुळून जा म्हणजे घोड्याची शेपटी काळ्या दिसली पाहिजे आणि ती पैज जिंकली पाहिजे. त्या वेळी काही नाग मुलांनी तसे करण्यास नकार दिला. मग कद्रूने आपल्या पुत्रांना शाप दिला की राजा जनमेजय यांच्या यज्ञात तुम्ही भस्म होऊन जाल. शाप ऐकल्यानंतर, सर्व साप मुले आईने सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या घोड्याच्या शेपटीशी एकरुप झाले. ज्यामुळे घोड्याची शेपटी काळी दिसू लागली.
snake3
पैज हरल्यामुळे विनाता कद्रूची दासी झाली. जेव्हा विनाताचा मुलगा गरुडला कळले की त्याची आई दासी झाली आहे, तेव्हा त्याने कद्रू आणि त्यांच्या नाग मुलांना विचारले की मी अशी कोणती गोष्ट आणून देऊ ज्यामुळे माझी आई तुमच्या गुलामगिरीतून मुक्त होईल. मग नाग मुलांनी सांगितले की जर तुम्ही आम्हाला स्वर्गातून अमृत आणून दिले तर तुझी आई आमच्या आईच्या गुलामगिरीतून मुक्त होईल.
snake4
नाग मुलांच्या सांगण्यानुसार, गरुडाने स्वर्गातून अमृत कलश घेऊन आला आणि कुशा (एक प्रकारचे तीक्ष्ण गवत) येथे ठेवली. त्यावेळी त्याने सर्व सापांना सांगितले की अमृत पिण्याआधी सर्वांनी स्नान करुन यावे. गरुडाच्या सांगण्यावरून सर्व साप स्नान करण्यासाठी गेले, पण त्या दरम्यान देवराज इंद्र तेथे आले आणि अमृत घेऊन ते स्वर्गाकडे परतले. जेव्हा सर्व सांप आंघोळ केल्यानंतर पर आले, तेव्हा त्यांनी पाहिले की कुशा येथे कोणताही अमृत कलश नाही. यानंतर सर्व सांपांनी गवत चाटण्यास सुरुवात केली, ज्यावर अमृत ठेवण्यात आले. त्यांना असे वाटले की अमृतचा थोडा भाग निश्चितपणे या ठिकाणी पडला असले. हे करून ते अमृत तर मिळवू शकले नाही, पण गवतामुळे त्यांच्या जीभेचे दोन तुकडे झाले होते.

Leave a Comment