अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका


मुंबई – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली. कोणतीही कागदपत्रे, न्यायालयाचा आदेश किंवा समन्स नसतानाही पोलिसांनी ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून अर्णब गोस्वामी यांच्यावर जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. आता निरनिराळ्या स्तरातून यावरून प्रतिक्रिया येत असून या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर भाजप आमदार आशिष शेलार यांनीदेखील निशाणा साधला आहे.


एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक. सरकार विरोधात सोशल मीडियावर बोलणाऱ्या निवृत्त नौदल अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचंच झालंय. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या. वा रे वा लोकशाही सरकार!,” असं म्हणत आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला.


आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने जात आहे का?,