युरो संकट भारतासाठी चिंतेचा विषय : मॉंटेक

लॉस काबोस,  दि. १९ –  योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेक सिंह अहलूवालिया म्हणाले की, भारताच्या आर्थिक वाढ दरात कमी असल्यामुळे आर्थिक समस्या नियंत्रणाबाहेर झालेली नाही; परंतु जर यूरो क्षेत्र संकटाचा त्वरित तोडगा काढला नाही तसेच यूरोपमध्ये आर्थिक स्थिरता बहाल झाली नाही तर स्थिती बिघडू शकते. विकसित व विकासनशील देशाच्या संघटना जी-२० शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी येथे आलेले अहलूवालिया म्हणाले की, जर यावर्षी भारताची जीडीपी (सर्व घरगुती उत्पादन) वाढ दर चालू आर्थिक वर्षात सात टक्केच्या जवळपास राहिली तर आमचा देश `भाग्यशाली’ ठरेल. शिखर बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंगसहित जगातील इतर नेते सहभाग घेत आहेत.

उल्लेखनीय आहे की, देशाचा आर्थिक दरवाढ २०११-१२ च्या चौथ्या तिमाहीत घसरून ५.३ टक्के राहिला जे नऊ वर्षात सर्वात कमी आहे. विनिर्माण तसेच कृषी क्षेत्राच्या खराब प्रदर्शनामुळे आर्थिक दरवाढ कमकुवत राहिला आहे. दोन दिवसीय जी-२० शिखर बैठकाचा प्रमुख एजेंडा युरो क्षेत्राला संकटातून बाहेर काढण्याचा उपाय शोधण्याचे आहे. जर असे झाले नाही तर भारत तसेच चीन सारख्या उभरणार्‍या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अहलूवालियानुसार येथे दिलेल्या विचारविमर्शाचे मुख्य आकलन हे आहे की, जागतिक अर्थव्यवस्था अत्यंत कमकुवत आहे जर यूरो क्षेत्र संकटातुन प्रभावी पद्धतीने निपटले गेले नाही, तर हे दुसर्‍या आर्थिक संकटाचे कारण बनु शकते.