
लॉस काबोस, दि. १९ – योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेक सिंह अहलूवालिया म्हणाले की, भारताच्या आर्थिक वाढ दरात कमी असल्यामुळे आर्थिक समस्या नियंत्रणाबाहेर झालेली नाही; परंतु जर यूरो क्षेत्र संकटाचा त्वरित तोडगा काढला नाही तसेच यूरोपमध्ये आर्थिक स्थिरता बहाल झाली नाही तर स्थिती बिघडू शकते. विकसित व विकासनशील देशाच्या संघटना जी-२० शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी येथे आलेले अहलूवालिया म्हणाले की, जर यावर्षी भारताची जीडीपी (सर्व घरगुती उत्पादन) वाढ दर चालू आर्थिक वर्षात सात टक्केच्या जवळपास राहिली तर आमचा देश `भाग्यशाली’ ठरेल. शिखर बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंगसहित जगातील इतर नेते सहभाग घेत आहेत.
