जयंत पाटलांचे इस्लामपूर पूर्णतः लॉकडाऊन, तीन दिवस दूध, भाजीपालाही मिळणार नाही


सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात कोरोनाग्रस्त कुटुंबियांच्या संपर्कात शहरातील 337 नागरिक आल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. नगरपालिका सभागृह झालेल्या बैठकीत सर्वानुमते इस्लामपूर शहरात कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आज, रविवार 29 मार्च पासून 31 मार्च अखेर पूर्णतः लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. फक्त मेडिकल स्टोअर्स या कालावधीत एक दिवसाआड सुरू राहणार असून दूध, भाजीपाला, किराणा दुकाने बंद राहणार आहेत.

शहरातील लॉकडाउनमध्ये बँका, पतसंस्थांनीही सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य गरज ओळखून इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन करण्यासाठी आणखी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे. 4 हजार लोकांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली जात आहे. सर्वेक्षणाची व्याप्ती वाढवली जात आहे. दुबार करावे लागले तरीही सर्व्हे केली जाणार. बफर झोनमध्ये असणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारले जातील आणि त्यांना, पुढील तीन महिने बाहेर पडता येणार नाही अशा पद्धतीचे नियोजन केले जात आहे.

त्याचबरोबर अत्यावश्यक बाब असलेले मेडिकल विषम तारखेला सुरू राहतील. मेडिकल सुरू न ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांचे परवाने रद्द केले जातील. कोरोनाबधित लोकांच्या जवळपास 400 लोक संपर्कात आले आहेत. कोरोनाबाधित राहत असलेला शहरातील साडेतीन किलोमीटर अंतराचा परिसर सील करण्यात आला आहे. यात 11 हजार लोकसंख्या बंदिस्त केली आहे. 27 इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहेत. याशिवाय येत्या तीन दिवसात इस्लामपूर शहराच्या व शहरातील प्रभागांच्या सीमा बंदिस्त केल्या जाणार आहेत.

Leave a Comment