६० वर्षे केवळ चहा आणि पाण्यावरच जगत आहेत ‘या’ आजीबाई


नवी दिल्ली : आजमितीस आपल्यापैकी कुणाला जर उपाशी राह म्हटले तर, आपल्यापैकी कितीजण आणि किती दिवस उपाशी राहू शकता? एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, फार फार तर मन मारून तुम्ही एक आठवडा राहू उपाशी राहू शकतो. पण त्यापूढे देखील कोणी तुम्हाला उपाशी रहा म्हणून सांगितले तर तुम्ही राहू शकता का? पण, येथे एका महिलेबाबतचा भलताच प्रकार पूढे आला आहे. गेली ६० वर्षे या महिलेने चक्क काहीही खाल्ले नसून एवढे करून देखील ठणठणीत आणि जिवंत आहे.

सरस्वतीदेवी असे या महिलेचे नाव असून, त्या ७५ वर्षांच्या आहेत. या आजीबाई केवळ चहा आणि पाण्यावरच जगतात असे सांगतात. या महिलेचा विवाह झाल्यावर त्या जेव्हा पहिल्यांदा बाळंत झाली तेव्ही त्यांना टाईफाईड झाला. दरम्यान, त्यांनी काहीही खाल्ले की तिला उलटी येत असे. त्यांनी अनेक उपाय करून पाहिले मात्र त्यांचा त्रास कमी झाला नाही. त्यानंतर त्यांनी केवळ मजबूरीने अन्न खाणे सोडून दिले. आता त्या केवळ चहापाण्यावरच पाणीच पीते. त्यांना पाच मुले असून, त्यांना जेवणाबाबत विचारले असता त्या हसून जेवणाला चक्क नकार देतात. यासंदर्भातील वृत्त पंजाब केसरी या वृत्तपत्राने वृत दिले असून पण ही महिला नेमकी कुठली आहे, याबाबतचा उल्लेख वृत्ता करण्यात आलेला नाही.

Leave a Comment