
बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्यातील जोरदार संभाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या संवादादरम्यान गौतम गंभीरने एक गोष्ट उघड केली, जी कदाचित विराटच्या चाहत्यांनाही माहित नसेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करत असल्याचे त्याने सांगितले. गौतम गंभीरने बीसीसीआय टीव्हीवरील संभाषणात सांगितले की, 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने प्रत्येक चेंडूपूर्वी भगवान शिवाचे नाव घेतले होते. गंभीरने सांगितले की, विराटने कांगारू गोलंदाजांच्या प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नमः शिवायचा जप केला होता आणि विराट कोहलीने त्या कसोटी मालिकेत एकूण 1093 चेंडू खेळले होते आणि याचा अर्थ असा की त्याने तेवढ्याच वेळा भगवान शिवाचा जप केला होता.
विराट कोहलीने 1093 वेळा का घेतले होते भगवान शिवाचे नाव? गौतम गंभीरने केला एक मजेशीर खुलासा
A Very Special Interview 🙌
Stay tuned for a deep insight on how great cricketing minds operate. #TeamIndia’s Head Coach @GautamGambhir and @imVkohli come together in a never-seen-before freewheeling chat.
You do not want to miss this! Shortly on https://t.co/Z3MPyeKtDz pic.twitter.com/dQ21iOPoLy
— BCCI (@BCCI) September 18, 2024
2014-15 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचा पराभव झाला असला, तरी विराट कोहलीसाठी ती मालिका खूप खास होती. याच मालिकेत विराट कोहली कसोटी कर्णधार झाला. धोनीने अचानक कर्णधारपद सोडले आणि जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली आणि त्याच मालिकेत या फलंदाजाने खूप धावा केल्या. विराटने त्या मालिकेत 86 पेक्षा जास्त सरासरीने 692 धावा केल्या होत्या. त्याने एकूण 4 शतके आणि एक अर्धशतक झळकावले. गौतम गंभीरने सांगितले की, विराट कोहलीने त्या दौऱ्यात जी फलंदाजी केली, तशी फलंदाजी कोणीही फलंदाज करू शकत नाही, असे मला वाटते. विराट कोहलीचा तो झोन वेगळा होता. गौतम गंभीरने सांगितले की 2009 मध्ये झालेल्या नेपियर कसोटीत तो स्वतः याच झोनमध्ये होता, ज्यामध्ये त्याने 436 चेंडू फलंदाजी केली होती आणि त्यादरम्यान लक्ष्मणने नाबाद 124 धावा केल्या होत्या. गंभीरने सांगितले की, त्या सामन्यादरम्यान तो हनुमान चालिसाचा जप करत होता.
बीसीसीआय टीव्हीवरील संभाषणात गौतम गंभीरनेही विराटच्या कर्णधारपदाचे कौतुक केले. त्याने विराटला सांगितले की तो चांगला कर्णधार बनला, कारण त्याने चांगली गोलंदाजी युनिट तयार केली. विशेषत: ज्याप्रकारे त्याने वेगवान गोलंदाजी आक्रमण तयार केले ज्यामध्ये बुमराह, शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज या नावांचा समावेश होता. विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे आणि त्याने एकूण 40 कसोटी सामने जिंकले आहेत.
