आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स जिथे जिथे सामने खेळणार आहे, तिथे त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याला क्रिकेट चाहत्यांच्या रोष आणि विरोधाचा सामना करावा लागत आहे. स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमधून हार्दिकसाठी केवळ अपमानाचेच भाव पाहायला मिळत आहेत. मुंबई इंडियन्सच्या वानखेडेवर त्याच्या घरच्या मैदानावरही हार्दिकला पसंती दिली जात नाही. 11 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत आरसीबी विरुद्ध असेच काहीसे घडताना दिसले. पण, विराट कोहलीकडून मैदानावर जे दिसले, ते आतापर्यंत रोहित शर्मा करताना दिसला नाही. विराट चाहत्यांसमोर हार्दिकच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.
हार्दिक पांड्याबद्दल क्रिकेट चाहत्यांच्या नाराजीचे कारण म्हणजे त्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले आहे. वास्तविक, आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिककडे कमान सोपवण्यात आली आहे आणि त्यामुळे क्रिकेट चाहते नाराज आहेत. रोहितच्या कट्टर चाहत्यांना ते पचवता आलेले नाही. त्यामुळेच हार्दिकला त्याच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सच्या वानखेडेपासून इतर कोणत्याही मैदानावर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
Kohli not appreciating the booing of hardik by Wankhede crowd. Telling them to cheer and reminding them he's an India player #MIvsRCB 👌 pic.twitter.com/ok5SYa3AkA
— Vighnesh Rane (@Vighrane01) April 11, 2024
आता जेव्हा RCB विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचा वानखेडेवर बसलेल्या प्रेक्षकांकडून अपमान केला गेला, तेव्हा विराट कोहलीला पाहावले नाही. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेला विराट हार्दिक पांड्यासाठी उभा राहिला. त्याने त्याच्या बाजूने भूमिका घेतली. विराटने प्रेक्षकांना त्याचा असा अपमान करू नका, असे सांगितले. तोही भारतीय खेळाडू असल्याचे स्पष्ट केले. त्याचा अपमान करण्याऐवजी त्याचा जयजयकार करावा. मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहलीने असे केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरू असताना विराटने हार्दिकची बाजू घेतल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट होते. हा सामना मुंबई इंडियन्सने जिंकला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आणखी एक पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सने आरसीबी विरुद्धचा सामना पहिल्या 27 चेंडू 7 विकेटने जिंकला, ज्यामध्ये विजयी धावा हार्दिक पांड्याच्या बॅटमधून आल्या. हार्दिक पांड्याने 16व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. हार्दिकने 350 च्या स्ट्राईक रेटने 6 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 21 धावा केल्या.