टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशी जिंकली. पहिली कसोटी गमावल्यानंतर, टीम इंडियाने पुढील चार सामने जिंकले आणि यासह ते कसोटी क्रमवारीत आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचले. टीम इंडियाच्या विजयादरम्यान आर अश्विनच्या घरीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्या आईला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले आणि त्यानंतर हा भारतीय गोलंदाज राजकोट कसोटी अर्धवट सोडून चेन्नईला गेला. अखेर अश्विनने आता खुलासा केला आहे की, त्या दिवशी काय घडले आणि त्याला सर्वात जास्त कोणी मदत केली. अश्विनने सांगितले की त्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याला खूप मदत केली आणि मला विश्वास बसत नाही की एखादी व्यक्ती एखाद्याबद्दल इतका विचार करू शकते.
अश्विनने यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितले की तो राजकोटमध्ये होता आणि त्याने आईच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल केला. त्याला आईला भेटायचे होते. पण डॉक्टरांनी अश्विनला सांगितले की, त्याची आई अद्याप अशा स्थितीत नाही की तिला व्हिडिओ कॉलमध्ये पाहता येईल. यानंतर अश्विन रडायला लागला. काही वेळाने रोहित शर्मा आणि राहुल द्रविड अश्विनच्या रूममध्ये गेले. राजकोटच्या बाहेर फ्लाइट मिळत नसल्याने अश्विन नाराज होता. त्याला लगेच चेन्नईला जावे लागले. यानंतर रोहित शर्माने त्याच्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली आणि त्यानंतर अश्विनसोबत दोन लोकांना ठेवले. रोहितने अश्विनची ज्या प्रकारे काळजी घेतली, हे सर्व पाहून त्याला धक्काच बसला.
Watch how Rohit Sharma cared for Ash.
The Emotional Rollercoaster @ashwinravi99 went through between picking his 500th and heading back home.
Part II of Bazball x Jamball is out! Video link below! 👇🏻https://t.co/uveFhON41m pic.twitter.com/Rf97OAULSO
— Crikipidea (@crikipidea) March 12, 2024
आर अश्विनने रोहित शर्माचे कौतुक करताना सांगितले की, मी भारतीय कर्णधारासारखा माणूस कधीच पाहिला नाही. अश्विन म्हणाला, रोहितचे मन खूप मोठे आहे. आयपीएलचे पाच जेतेपद असलेल्या खेळाडूसाठी हे इतके सोपे काम नाही. तो यापेक्षा अधिक पात्र आहे आणि देव त्याला ते देईल. या स्वार्थी जगात इतरांचा विचार करणारी व्यक्ती असते, अशी व्यक्ती क्वचितच पाहायला मिळते.