भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषकात सलग चौथा विजय मिळवला आहे. शुक्रवारी टीम इंडियाने नेपाळचा 132 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली होती आणि दोन फलंदाजांनी शतकेही ठोकली होती. भारतीय संघ सुपर-सिक्सच्या गट-1 मध्ये नंबर-1 वर कायम असून आता विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने आपले प्रयत्न वाढवले आहेत. नेपाळचा संघ केवळ 165 धावा करू शकला.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 297 धावांची मोठी धावसंख्या उभारली, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती आणि तरीही टीम इंडिया एवढी मोठी धावसंख्या गाठू शकली. येथे टीम इंडियासाठी दोन शतके आली, कर्णधार उदय शरणने 107 चेंडूत 100 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 चौकारही मारले.
A fifth consecutive semi-final appearance for India in the Men's #U19WorldCup 😯#INDvNEP pic.twitter.com/61hLavRvp7
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 2, 2024
कर्णधाराला साथ देत सचिन धसनेही शानदार खेळी खेळली, त्याने 101 चेंडूत 116 धावा केल्या. सचिननेही आपल्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार मारले, या दोन डावांच्या जोरावर टीम इंडियाने चमत्कार केला आणि उर्वरित काम भारतीय गोलंदाजांनी केले. नेपाळ संघाला सुरुवातीला काही भागिदारी करता आली, पण त्याचा फायदा उठवता आला नाही.
नेपाळची पहिली विकेट 48 धावांवर पडली आणि त्यानंतर संघाचा तोल ढासळला. टीम इंडियासाठी सौमी पांडेने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, शिवाय अर्शीन कुलकर्णीनेही दोन विकेट घेतल्या. या मोठ्या विजयासह टीम इंडियाने लागोपाठ चार सामने जिंकले असून आता ग्रुपमध्ये टॉपर आहे.
टीम इंडियाने नेपाळपूर्वी न्यूझीलंड, आयर्लंड आणि बांगलादेशलाही हरवले आहे. या चार विजयांमध्ये सामाईक गोष्ट म्हणजे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून सर्व सामने जिंकले आहेत आणि सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भारतीय संघ सलग पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.