भारतीय महिला क्रिकेट संघाला रविवारी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची मोठी संधी होती. मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ही संधी गमावली. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून सहा विकेट्सने पराभव झाला. यासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारतीय संघाने कमी धावसंख्या उभारून ऑस्ट्रेलियाला 131 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने 19 व्या षटकापर्यंत सामना आपल्या ताब्यात घेतला आणि नंतर सामना गमावला. सामन्यानंतर संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या पराभवासाठी युवा गोलंदाज श्रेयंका पाटीलला जबाबदार धरले. मात्र हरमनप्रीतच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 12 चेंडूत 15 धावांची गरज होती. हरमनप्रीत कौरने 19 वे षटक पाटीलला दिले आणि या षटकात टीम इंडियाचा सामना गमवावा लागला. सामन्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली होती की, पाटीलने 19व्या षटकात दिशाहीन गोलंदाजी केली नसती, तर भारतीय संघ सामना जिंकू शकला असता. भारताने पहिला सामना जिंकला होता आणि दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यास मालिका निश्चित झाली असती. आता मालिकेतील तिसरा सामना निर्णायक ठरला आहे.
Wow.. what an inspirational leader calling out a 21 year old who has taken a wicket every game in her FIVE – yes just five – T20internationals. Someone in the Indian team management really needs to give Harmanpreet some media training and integrity. https://t.co/8kM60yeVOD
— Erika Morris (@ErikaMorris79) January 7, 2024
हरमनप्रीतच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. हरमनप्रीतने पराभवाचे खापर 21 वर्षीय तरुण गोलंदाजावर फोडणे चांगले नाही, असे सोशल मीडियावर बोलले जात आहे. त्याच वेळी, काही लोक असेही म्हणतात की हरमनप्रीत कौर स्वतः बॅटमध्ये अपयशी ठरत आहे आणि त्यानंतर ती एका युवा खेळाडूला दोष कसा देऊ शकते. एका यूजरने लिहिले की, हरमनप्रीतने 12 चेंडूत सहा धावांऐवजी अधिक धावा केल्या असत्या, तर खूप फरक पडला असता. पाटीलने या सामन्यात चार षटके टाकली आणि 40 धावांत एक गडी बाद केला.
If you had scored better than 6 off 12, it would have made a huge difference to your team too, Harmanpreet.#INDvAUS https://t.co/WRdlBTV8UB
— CricBlog ✍ (@cric_blog) January 7, 2024
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 8 गडी गमावून 130 धावा केल्या. संघाच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. दीप्ती शर्मा ही संघाची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. 27 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 30 धावा करण्यात ती यशस्वी ठरली. रिचा घोष 19 चेंडूत 23 धावा करू शकली. सलामीवीर स्मृती मानधनाने 26 चेंडूत 23 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅलिसा पेरीने नाबाद 34 आणि फोबी लिचफिल्डने नाबाद 18 धावांची खेळी करत संघाला विजयाकडे नेले. या दोघांशिवाय अॅलिसा हिलीने 26 धावांची तर बेथ मुनीने 20 धावांची खेळी खेळली.