Ayurveda : निरोगी गर्भधारणेसाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या या आहार पद्धतीचा नऊ महिने करा अवलंब


कोणत्याही महिलेसाठी गर्भधारणेचा टप्पा जितका खास असतो, तितकाच तो नाजूकही असतो. या काळात खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदरपणात कधी आणि कोणते खाणे योग्य आहे याची सविस्तर माहिती आयुर्वेदात दिलेली आहे. आयुर्वेदात दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास निरोगी गर्भधारणा होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान, बाळाचा आईच्या उदरात विकास होत असताना, स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात आणि अन्न आणि पोषणाच्या गरजा देखील भिन्न बनतात. निरोगी आई आणि मुलासाठी, आयुर्वेद गर्भधारणेच्या महिन्यांनुसार आहार घेण्याची शिफारस करतो.

आयुर्वेदात नेहमीच चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार घ्या, असे सांगितलेले आहे. त्याच वेळी, गर्भधारणेदरम्यान, महिलांनी पोटातील बाळाचे पोषण करण्यासाठी पोषक तत्वांनी समृद्ध अन्न खाणे आवश्यक आहे. आयुर्वेदाने सांगितलेला आहार गर्भधारणेदरम्यान महिन्याने महिन्याने पाळला, तर गर्भधारणा तर निरोगी राहतेच, शिवाय बाळाला सर्व आवश्यक पोषक तत्त्वेही मिळतात. दरम्यान तज्ज्ञांकडून जाणून घेऊया, गरोदरपणात महिलांनी काय खावे?

गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत कसा असावा आहार?
आयुर्वेदात वात, कफ आणि पित्त लक्षात घेऊन आहाराच्या सूचना दिल्या आहेत. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत वात संतुलित करणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत महिलांनी हलके तेलकट पदार्थ जसे की सूप, भाजलेल्या भाज्या खाव्यात. याशिवाय दही आणि तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. ओट्स लाडू, आवळा मुरब्बा आणि ब्राह्मी, शंखपुष्पी यांसारख्या औषधी वनस्पती स्नॅक्स म्हणून घ्याव्यात. यामुळे शरीराला ताकद मिळते.

दुसऱ्या तिमाहीत खाण्यासाठी कोणते आहे योग्य अन्न ?
गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत पित्त दोष म्हणजेच अग्नि तत्व संतुलित करणे आवश्यक आहे. पित्ताला शांत करण्यासाठी, या काळात शरीराला थंडावा देणारे पोषक तत्वांनी युक्त असे पदार्थ खावेत, जसे नारळपाणी, दूध, टरबूज, काकडी इ. यामुळे मूड स्विंगसारख्या समस्या दूर होण्यासही मदत होते. गर्भधारणेदरम्यान, जास्त तळलेले अन्न टाळण्याची खात्री करा, जेणेकरून पचन व्यवस्थित ठेवता येईल.

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत कसा असावा आहार ?
गरोदरपणाचा तिसरा तिमाही, म्हणजे सातव्या ते नवव्या महिन्यापर्यंतचा कालावधी चढ-उतारांनी भरलेला असतो. या काळात महिलांमध्ये शारीरिक, मानसिक बदलही झपाट्याने होतात. आयुर्वेद म्हणतो की या टप्प्यात, गर्भवती महिलांनी त्यांच्या कफ उर्जेचे संतुलन राखणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना निरोगी प्रसूती करता येईल. तिसऱ्या तिमाहीत, महिलांनी त्यांच्या आहारात धान्य, भाज्या, शेंगा, मसाले आणि काही औषधी वनस्पती यासारखे गरम आणि कोरडे पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत. यामुळे आई आणि बाळ दोघांनाही निरोगी राहण्यासाठी आवश्यक पोषक तत्व मिळतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही