भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रत्येक यशाचा भारत आनंद साजरा करत असताना इस्रोकडून एक दुःखद बातमी समोर आली आहे. देशातील शास्त्रज्ञ वालारामथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. इस्रोच्या सर्व प्रक्षेपणांच्या काउंटडाऊन दरम्यान जो आवाज ऐकू आला, तो वलरामथी यांचा होता. मात्र आता हा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही.
इस्रोच्या शास्त्रज्ञाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, चांद्रयान-3 होते शेवटचे मिशन
चांद्रयान-3 हे शास्त्रज्ञ वलरामथी यांचे शेवटचे मिशन होते, जे 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते आणि त्या दरम्यान तुम्ही इस्रो मधून जो आवाज ऐकला, तो वलरामथी यांचा होता. तामिळनाडूतील अलियायुर येथील वलरमथी यांनी शनिवारी चेन्नईत अखेरचा श्वास घेतला.
The voice of Valarmathi Madam will not be there for the countdowns of future missions of ISRO from Sriharikotta. Chandrayan 3 was her final countdown announcement. An unexpected demise . Feel so sad.Pranams! pic.twitter.com/T9cMQkLU6J
— Dr. P V Venkitakrishnan (@DrPVVenkitakri1) September 3, 2023
इस्रोचे माजी संचालक पी.व्ही. वेंकटकृष्णन यांनी ट्विट करून वलरामथी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले. त्यांनी लिहिले की श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या आगामी मोहिमेदरम्यान, वलरामथी मॅडमचा आवाज यापुढे काउंटडाउनमध्ये ऐकू येणार नाही. चांद्रयान-3 ही त्यांची अंतिम घोषणा होती. हा अत्यंत दु:खद क्षण आहे. अभिवादन.
The voice of Valarmathi Madam, Chandrayan 3 was her final countdown announcement. An unexpected demise . Feel so sad. pic.twitter.com/zQFIIZIj84
— Deepak Tirkey🇮🇳 (@Deepaktirkey09) September 4, 2023
देशवासी सोशल मीडियावर शास्त्रज्ञ वलरामथी यांचे स्मरण करत आहेत आणि त्यांच्या इस्रोमधील योगदानाला सलाम करत आहेत. प्रत्येकजण त्यांच्या आवाजाची प्रशंसा करत आहे आणि प्रत्येकाशी एक संबंध कसा तयार झाला याबद्दल लिहित आहे.
काही काळापासून इस्रो सतत चर्चेत आहे. आधी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण आणि नंतर यशस्वी लँडिंगने इतिहास रचला. आता आदित्य एल-1 लाँच करण्यात आले आहे, जे सूर्याचा अभ्यास करेल. इस्रोचे चांद्रयान-3 देखील पूर्ण झाले आहे, चंद्राच्या दक्षिणेला पाठवलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले आहेत आणि आता 22 सप्टेंबरची प्रतीक्षा आहे. याच दिवशी चंद्राच्या या भागावर पुन्हा दिवस येईल, त्यानंतर विक्रम-प्रज्ञान पुन्हा कार्य सुरु करू शकेल अशी आशा आहे.