नवी दिल्ली : एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी पोलिसांची क्रूरता आणि मुस्लिमांवरील जमावाच्या हिंसाचारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुजरातमध्ये काही मुस्लिम तरुणांना जाहीरपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी भाजप सरकारला घेरले आहे. ते म्हणाले की, दररोज मोठ्या प्रमाणावर धर्मांधतेचे पुरावे मिळत आहेत.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मुस्लिम तरुणांना बेदम मारहाण करणे आणि पोलिसांकडून जमावाने हिंसाचार करणे सामान्य झाले आहे.
ओवेसींचा भाजप सरकारवर हल्लाबोल
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मोठ्या प्रमाणात कट्टरतावादाची अधिक प्रकरणे समोर येत आहेत आणि जमावाकडून हिंसाचार सामान्य झाला आहे. मुस्लिमांविरुद्धच्या लक्ष्यित हिंसाचाराला न्याय मानला जातो. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मोदींच्या विश्वगुरुचे हे वास्तव आहे, नवा भारत बनणे आणि 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्थेची पोलखोल.
Everyday there is more evidence of mass radicalisation. Floggings & mob violence by cops have become common. Targeted violence against Muslims is treated as “justice”. This is the reality of Modi’s Vishwaguru/New India/5G/$5 Trillion Ton economy https://t.co/n2rQHy8YOg
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 5, 2022
तरुणांना खांबाला बांधून मारहाण केल्यावरुन सवाल
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटमध्ये एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओही टॅग केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस काही तरुणांना सार्वजनिकरित्या बांधून मारहाण करत आहेत. भाजपशासित गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात दगडफेक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नऊ मुस्लिम तरुणांना पोलिसांनी खांबाला बांधून उघडपणे छडीने मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी जमावाने घोषणाबाजीही केली.
गरबा कार्यक्रमादरम्यान झाली दगडफेक
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील उंडेला गावात नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमादरम्यान काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी दगडफेक केल्याचा आरोप आहे, त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि त्यानंतर साध्या गणवेशातील पोलिसांनी आरोपींना सार्वजनिक ठिकाणी बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, गावच्या सरपंचाने मंदिरात गरबा कार्यक्रम आयोजित केला होता, जो मुस्लिम समाजातील काही लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला.