नवी दिल्ली: सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती यूयू ललित हे भारताचे पुढील सरन्यायाधीश बनले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी उच्च न्यायालयात न्यायाधीश नसलेले दुसरे CJI बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या आधी 1971 मध्ये न्यायमूर्ती एसएम सिक्री यांना थेट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले होते. मात्र, न्यायमूर्ती यू यू ललित यांचा सरन्यायाधीशपदावर कार्यरत राहण्याचा प्रवास फार काळ होणार नाही. 27 ऑगस्ट रोजी CJI म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर ते 8 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त होतील.
न्यायमूर्ती कमल नारायण सिंह यांचा 25 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 1991 पर्यंत भारताचे सरन्यायाधीश (CJI) म्हणून 18 दिवसांचा सर्वात कमी कार्यकाळ होता.
यू यू ललित हे झाले देशाचे 49 वे सरन्यायाधीश
न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी आज देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. UU ललित यांचा जन्म 1957 मध्ये सोलापूर, महाराष्ट्र येथे झाला. 1985 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली आणि त्यानंतर 1986 मध्ये दिल्लीत आले. यूयू ललित यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी केली. न्यायमूर्ती UU ललित यांचा CJI म्हणून कार्यकाळ केवळ 74 दिवसांचा असेल. दरम्यान 100 दिवस आपल्या पदावर राहिलेल्या CJI ची माहिती घेऊया.
100 दिवसांपेक्षा कमी काळ पदावर राहिले हे CJI
- न्यायमूर्ती कमल नारायण सिंह यांचा 25 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 1991 पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून सर्वात कमी 18 दिवसांचा कार्यकाळ होता.
- न्यायमूर्ती एस राजेंद्र बाबू यांचा दुसरा सर्वात कमी कालावधी 2 मे 2004 पासून 30 दिवसांचा होता.
- न्यायमूर्ती जेसी शाह यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून 17 डिसेंबर 1970 ते 21 जानेवारी 1971 असा 36 दिवसांचा कार्यकाळ होता.
- न्यायमूर्ती गोपाल बल्लभ पटनायक यांनी 8 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2002 पर्यंत केवळ 40 दिवस CJI म्हणून काम केले.