अ‍ॅसिडिटीवर करून बघा हे सोपे उपाय


पचकनक्रिया बिघडल्याने अॅसिडिटीचा त्रास होतो किंवा पित्त खवळते. भूक नसताना खाणे, अतिखाणे, अवेळी खाणे किंवा उपाशी राहणे, प्रचंड गॅप दोन जेवणांमध्ये असणे ही याची कारणे आहेत. आम्ही जे उपाय आज तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे तुमची अॅसिडिटी कायमची पळून जाईल.

तेलकट-तूपकट किंवा जळजळीत खाल्लेले तरुण वयात किंवा लहान वयात पचते. पण पुढे तीच सवय त्रासदायक ठरते. त्यामुळे अतितेलकट, चमचमीत दररोज खायची सवय असल्यास ती सर्वप्रथम बदला. आपल्या शरीराची गरज, प्रकृतीचे संकेत ओळखून त्याप्रमाणे वागायला शिका. म्हणजे भूक नसतानाही खाणे, पोट भरल्यानंतरही खाणे, भूक लागली तरी न जेवणे, जेवण लांबवणे हे टाळायला हवे.

आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे. तरच आपले अन्नपचन सुलभ होईल. त्यामुळे नियमित चालणे आणि व्यायाम नसेल तर गोळ्या घेऊनही अॅसिडिटी संपायची नाही. त्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे. अनेक आम्ल अन्नपचनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. पाणी त्याचे संतुलन राखण्याचे काम करते. त्यामुळे पुरेसे पाणी प्यायलाच हवे. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्यायलात तर जास्त फायदा मिळेल. प्रकृती अस्वास्थ्याचे तणाव हे मूळ कारण आहे. स्ट्रेस किंवा ताणामुळे अन्नपचन नीट होत नाही. आम्लपित्त वाढते. त्यामुळे मन शांत ठेवा. टेन्शन घेऊ नका. कुठल्याही कामात किंवा छंदात एकाग्र व्हायचा प्रयत्न करा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment