आज दिवसभरात राज्यात ६ हजार ९५९ कोरोनाबाधितांची नोंद, तर २२५ मृत्यू


मुंबई – कोरोनाची राज्यातील दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही कोरोनाबाधित दररोज आढळून येत असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत दररोज वाढ सुरूच आहे. तर, दररोज आढळणारी नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही कधी दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त, तर कधी कमी आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात २२५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ६ हजार ९५९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ७ हजार ४६७ रूग्ण कोरोनातून बरे देखील झालेले आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण ६०,९०,७८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट) ९६.६२ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७९,६७,६०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,०३,७१५ (१३.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७६,६०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७६,७५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.