उद्यापासून होणार राज्यात अनलॉकच्या या नव्या नियमांची अंमलबजावणी


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे आता लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येत असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकारपरिषदेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यांनी यावेळी राज्यातील बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही जाहीर केला.

वडेट्टीवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहे. त्यासाठी कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु होणार आहे. पण, इतर जिल्ह्यांमध्ये अंशतः अनलॉक करण्यात येईल. तसेच उद्यापासून या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील जिल्हेः ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, धुळे, गोंदिया, लातूर, नागपूर, नांदेड, चंद्रपूर, नाशिक, परभणी, गडचिरोली, जालना, जळगाव

काय सुरु राहणार?

  • रेस्टॉरंट्स, मॉल्स
  • मैदाने, वॉकिंग ट्रॅक्स
  • खासगी आणि सरकारी कार्यालये 100 टक्के सुरु
  • सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यांना परवानगी
  • जीम, सलून
  • आंतरजिल्हा प्रवास
  • ई-कॉमर्स सुविधा

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हेः मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर अमरावती, हिंगोली

काय सुरु राहणार?

  • ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट्स
  • ५० टक्के क्षमतेने म़ॉल्स, थिएटर्स
  • सार्वजनिक जागा, मैदानं वॉकिंग ट्रॅक पूर्णपणे सुरु
  • बांधकामं, कृषीविषयक कामं पूर्णपणे सुरु
  • जीम, सलून ५० टक्के क्षमतेने सुरु
  • बसेस पूर्ण क्षमतेने सुरु
  • जिल्ह्याबाहेर जायला परवानगी, मात्र पाचव्या टप्प्यातल्या जिल्ह्यात जायचं असेल तर पास काढावा लागणार.

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हेः अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर.

काय सुरु राहणार?

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते २
  • इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ (शनिवार, रविवार बंद)

चौथ्या टप्प्यातील जिल्हेः पुणे, रायगड
चौथ्या टप्प्यातील जिल्ह्यांसाठीचे निर्बंध कायम राहतील.