तोक्ते चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन


मुंबई : तोक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी (मासे, कासव इ.) वाहून आल्याचे दिसून आल्यास तसेच बोटींचे व मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाने केले आहे. यासाठी सागरी किनाऱ्यावरील प्रत्येक जिल्ह्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागाने जाहीर केले आहेत.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे-

मुंबई शहर

  • वरळी / ससून गोदी : कु. पाटील (७९७२२६३९४७)
  • नवीन भाऊचा धक्का: श्री. बादावार (९४२२८७२८५६)

ठाणे / पालघर

  • ठाणे : श्री. पाटील (९९२३०५०९८३)
  • डहाणू : कु. भोय (८६००६२७९०८)
  • सातपाटी : श्री. बाविस्कर (८४४६३२५०४०)
  • वसई : श्री. कोरे (९८२३०४११८९)
  • एडवण : श्री. अलगिरी (९८२३२१२७२२)

रत्नागिरी

  • जयगड : सौ.कांबळे (८३६९०८५०४९)
  • मिरकरवाडा : श्री. पाथरे (९५९४७४८७३८)
  • साखारीनाटे : श्री. महाडवाला (९४०५९१०५०३)
  • गुहाघर : श्री. देसाई (९४०५०८५६१५)
  • दाभोळ : सौ.साळवी (८२७५४३५७०३)

मुंबई उपनगर

  • माहुल तुर्भे : श्री. साबळे (८२०८९०६९०२)
  • वर्सोवा : श्री. बुंदेले (९८३३९११९०५)
  • मढ गोराई : श्री. जावळे (९८३३२६६२५१)

रायगड

  • उरण : श्री. दाभणे (७०२१५४२११२)
  • अलिबाग : श्री. अंबुलकर (८०८०९९२२०३)
  • मुरुड : श्री. वाळुंज (७७९८७१६७२७)
  • श्रीवर्धन : श्री. पाटील (९८८१४५२४३६)

सिंधुदुर्ग

  • देवगड : श्री.मालवणकर (९४२२२१६२२०)
  • वेंगुर्ला : श्री. जोशी (९४२१२३८९१३)
  • मालवण : श्री. भालेकर (९८२३५७९३८२)

याशिवाय मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी सूचनाही केल्या आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या मासेमारी नौका आणि इतर साधने सुरक्षित ठेवावीत. नौका मालकांनी खलाशांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी. जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक साधनसामुग्री सोबत बाळगावी, असे आवाहनही विभागाने केले आहे.

‘तोक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जिल्ह्यातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
‘तोक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ३८९६, सिंधुदुर्ग- १४४ आणि रायगड जिल्ह्यातील २५०० लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.