मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयनंतर आता अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुखांविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द केला जावा अशी मागणी करणारी याचिका केली आहे. न्यायालयाने या याचिकेला स्थगिती दिली आहे. दरम्यान ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
ED ने अनिल देशमुख व त्यांचे सचिव कुंदन आणि पालांडे यांच्या विरोधात वाझे वसुली प्रकरणात गुन्हा, FIR / ECIR नोंदवला आहे. अनिल देशमुख व ग्रुप द्वारा ₹100 कोटींची हेरफेर, भ्ष्टाचाराचा पैसा, मनी लाँडरींग….
पुढचा नंबर अनिल परब चा लागणार @BJP4Maharashtra pic.twitter.com/0XxF40QHpq
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 11, 2021
याच दरम्यान ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.