महाराष्ट्राच्या मदतीसाठी आंध्र प्रदेशचा हात, देणार 300 व्हेंटिलेटर्स – जगनमोहन रेड्डी


नागपूर: कोरोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका देशात महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अविरत लढत आहे. महाराष्ट्र केंद्राकडे वारंवार रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्ससाठी आर्जव करत आहे. महाराष्ट्रावर ओढावलेल्या संकट काळात आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावून आले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी नितीन गडकरी यांनी चर्चा केली होती. त्या चर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केल्याची माहिती नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.