नवी दिल्ली : आता कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून देशातील राजकारण तापले आहे. कोरोना लस पुरवठ्यावरून महाराष्ट्राशी केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आरशासमोर उभे रहावे आणि स्वत: ला प्रश्न विचारावा की महाराष्ट्राला आवश्यक तेवढ्या कोरोनाच्या लसींचा पुरवठा केंद्राने केला आहे का? असा प्रश्नही त्यांना विचारला आहे.
केंद्राने महाराष्ट्राला आवश्यक तेवढ्या कोरोनाच्या लसींचा पुरवठा केला आहे का? – चिदंबरम
The Centre is targeting Maharashtra on the spread of COVID-19 ignoring hard facts
Maharashtra has vaccinated 80 per cent of healthcare workers. Nearly 20 states are behind Maharashtra
Maharashtra has vaccinated 73 per cent of frontline workers. Only 5 states have done better
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 8, 2021
सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार काही जठील तथ्यांच्या आधारे महाराष्ट्राला कोरोनाच्या प्रसारावरून लक्ष्य करत आहे. आतापर्यंत आपल्या 80 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण महाराष्ट्राने पूर्ण केले आहे. यामध्ये जवळपास 20 राज्ये ही महाराष्ट्राच्या मागे आहेत. महाराष्ट्राने आतापर्यंत 73 टक्के फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाची लस दिली आहे. यामध्ये केवळ पाच राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
In vaccinating senior citizens, Maharashtra stands fifth in the country
These facts are from the Union Health Minister’s statement!
The Union Health Minister should stand before a mirror and ask the question if the Centre has supplied enough vaccine doses to Maharashtra
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 8, 2021
पी. चिदंबरम म्हणाले की, महाराष्ट्राचा ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत पाचवा क्रमांक आहे. या सर्व गोष्टी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट होतात. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आरशासमोर उभे रहावे आणि स्वत:ला प्रश्न विचारावा की केंद्राने महाराष्ट्राला आवश्यक तेवढ्या कोरोनाच्या लसींचा पुरवठा केला आहे का?
The Centre has made a complete mess of the vaccination programme including the non-supply of sufficient doses of vaccines
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 8, 2021
जो काही गोंधळ देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमात निर्माण झाला आहे, तो केंद्रानेच घातल्याचा आरोप माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिंदंबरम यांनी केला आहे. केंद्राने घातलेल्या या गोंधळामुळेच राज्यांना आपश्यक त्या प्रमाणात कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.