ठाकरे सरकारने राज्यपालांच्या हवाई प्रवासाला परवानगी नाकारली


मुंबई : ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात सुरु असलेला वाद शमताना दिसत नाही. सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद ठराविक दिवसांनी उफाळून येत आहे. आता तर मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांच्या हवाई प्रवासाला परवानगीच दिली नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे विमानात बसल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांना परवानगी नसल्याचे कळल्यामुळे विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की राज्यपालांवर ओढावली.

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद न देण्यात आमुळे राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. उत्तराखंडकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जात होते. ते त्यावेळी सरकारी विमानाने निघाले होते. पण ठाकरे सरकारने राज्यपालांच्या या प्रवासाला परवानगीच दिली नसल्याचे समोर आले आहे.