राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय 2-4 दिवसात तारीख जाहीर करू : उदय सामंत


मुंबई : कोरोनामुळे जगासह देशाचे जनजीवन विस्कळीत झाले होते, पण आता ते हळूहळू पूर्वपदावर येत आहे. टप्प्याटप्प्याने शाळा देखील सुरु करण्यात येत आहेत. पण राज्यातील विद्यापीठे कधी सुरु होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. राज्यातील विद्यापीठे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात असून SOP ठरवून टप्याटप्याने महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत काल बैठक झाली. विद्यापीठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत सर्व विद्यापीठचे कुलगुरू सकारात्मक आहेत. विद्यापीठे सुरू करत असताना SOP तयार करण्याचे काम सुरू आहे. विद्यापीठ आणि राज्य शासन मिळून SOP ठरवतील, असे उदय सामंत यांनी सांगितले.

वसतिगृह सुरू करण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे. कारण काही वसतिगृह अजूनही क्वॉरंटाईन सेंटर आहेत. ते सुद्धा टप्याटप्याने सुरू केली जाणार आहेत. आता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली डिजास्टर मॅनेजमेन्टसोबत बैठक होईल आणि त्यानंतर तातडीने कॉलेज सुरू करण्याबबत निर्णय होईल. कॉलेज सुरू होण्याची तारीख 2 ते 4 दिवसात जाहीर करू, असे उदय सामंत यांनी सांगितले.

कुलगुरूचे म्हणणे आहे काही ठिकाणी ऑनलाईन तर काही ठिकाणी ऑफलाईन वर्ग सुरू करावे. पण आम्ही सांगितले की विद्यापीठांनी SOP तयार कराव्यात, कारण यूजीसी गाईडलाइन्सनुसार त्या होतील. राज्यपाल , कुलगुरू यांच्यासोबत चर्चा करताना सांगितले की कॉलेज सुरू करताना 100 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थित कॉलेज सुरू करता येणार नाही, शासन असा निर्णय घेणार नाही. SOP ठरवून विद्यार्थी उपस्थिती पाहून टप्याटप्याने कसे कॉलेज सुरू करायचे याबाबत निर्णय घेऊ. कॉलेज सुरू करण्याबबत निर्णय झाला आहे, फक्त कागदावर येणे बाकी असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले.