चांगले काम केले तरी फडणवीस हे टीकाच करणार – अनिल देशमुख


पुणे – वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस टीका करत असतात. दरम्यान चांगले काम केले तरी देवेंद्र फडणवीस हे टीकाच करणार आहेत. ते टीका त्यांचे दुकान बंद होऊ नये म्हणून करत असतात, असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला. नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला अनिल देशमुख यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

काही मागण्या येरवडा कारागृहबाबत होत्या. यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे त्याबाबतचे निवेदन सोपवण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त संख्या कारागृहात असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला असल्याचे माहिती यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.

रितसर कारवाई भिडे, एकबोटे यांच्यावर होईल आणि चार्जशीटचा प्रस्ताव देखील मंजूर केला गेला असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच बी. जी. कोळसे पाटलांची सुरक्षा का काढली याचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान याआधी सुबोध कुमार जैस्वाल यांच्यावरून तुम्हाला देवेंद्र फडणवीस हे लक्ष करीत असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता असल्यामुळे आमच्या बद्दल जे काही बोलणार ते विरोधातच बोलणार असल्यामुळे त्यांच्याकडे एवढे काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही.