मुंबई – कोरोन व्हायरसने देशभरासह राज्याला सुरुवाती पासूनच आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली होती. पण आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा वेग मंदावला आहे. पण जगभरासह अनेक देशातील बहुतांश जणांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या उलट महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर जरी कोरोनाची दुसरी लाट आल्यास राज्य सरकार त्याला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज राजेश टोपे यांनी सांगितले आहे,
राज्यातील लॉकडाऊन मिशन बिगीन अंतर्गत हळूहळू शिथील केला जात आहे. तसेच आता अनलॉकच्या विविध टप्प्यांनुसार काही गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण कोरोनाचे संकट अद्याप कायम असून नियम आणि अटींचे नागरिकांनी पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत. तसेच राज्यात मंदिराचे दरवाजे पुन्हा एकदा सुरु करण्याबद्दल दिवाळी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन घेतला जाणार आहे.
दरम्यान, मुंबईत 244 ठिकाणी कोरोना व्हायरसची चाचणी मोफत केली जाणार असल्यामुळे या चाचणीसाठी नागरिकांना आता शुल्क मोजावे लागणार नाही. नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक वॉर्ड वॉर रूमवर किंवा 1916 वर कॉल करावा लागेल किंवा आपल्या घराजवळील जवळील चाचणी केंद्र जाणून घेण्यासाठी ऑनलाईन तपासू शकतात. अशा चाचणी केंद्रांची संख्या 300 वर घेऊन जाण्याचा मानस आहे. जवळपास 54 खासगी प्रयोगशाळा होम सर्व्हिससह या चाचण्या देत आहेत. सुरुवातीला ही सुविधा सर्व नागरी प्रभागांमधील विविध नागरी दवाखाने व रुग्णालयांमध्ये, सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत जाण्यासाठी उपलब्ध असणार आहे.