राजामौलींच्या बहुचर्चित आरआरआर चित्रपटाचा टीझर रिलीज


बाहुबली फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या बहुभाषिक आणि बहुचर्चित आरआरआर चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआरच्या व्यक्तिरेखेचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात एनटीआरने भीमा हे पात्र साकारले असून नुकताच या चित्रपटाचा टीझरदेखील रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर अतिशय जबरदस्त असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या टीझरला मिळत आहे. टीझरमधील सीन्सद्वारे भीमाच्या चारित्र्याचे अमर्याद सामर्थ्य आणि इच्छाशक्ती दर्शविली गेली आहे. भीम जंगलातील विचित्र परिस्थितीत पळताना यात दाखवण्यात आला आहे. त्याच्याकडे समुद्र थांबविण्याची क्षमता असल्याचे सांगितले जात आहे. एस.एस. राजामौली यांनी दृश्यांना शूट करण्यासाठी ज्याप्रकारे कॅमेरा अँगल वापरला आहे. त्यानुसार, संपूर्ण चित्रपटात जबरदस्त सीन असणार याची प्रचिती येत आहे.

या चित्रपटाचा टीझर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने शेअर केला आहे. आलियाने या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे की, भीमबद्दल सांगण्यापेक्षा आपल्या रामराजूपेक्षा श्रेष्ठ कोण असू शकेल? भीमला भेटा. आलिया भट या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. याशिवाय अजय देवगनदेखील एका खास भूमिकेत दिसणार आहे. आरआरआर चित्रपटाचे पूर्ण नाव रुद्रराम रणम रुधिराम असे आहे. ज्यूनिअर एनटीआरच्या पात्राचे ज्यात पूर्ण नाव कोमाराम भीमा आहे. कोमाराम भीमा हा एक स्वातंत्र्यसैनिक होता. त्याने तरुणपणीच गाव सोडले होते. पण तो जेव्हा परत आला, तेव्हा तेथे सुशिक्षित लोक होते. त्याने आदिवासींसाठी निजामाच्या राजवटीविरूद्ध युद्ध केले होते. त्यांनी गनिमी युद्धाची शैली अवलंबिली आणि नंतर ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देऊन शहीद झाले.

याशिवाय या चित्रपटाचा टीझर शेअर करताना दिग्दर्शक राजामौली यांनी म्हटले आहे की, आपल्या स्वतःच्या रामराजापेक्षा भीमची शक्ती कोण अधिक चांगल्या प्रकारे दाखवू शकेल. भीमा तुमच्या सर्वांसाठी उपस्थित आहे. ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवशी 20 मे रोजी टीझर येणार होता. दरम्यान, राम चरनच्या वाढदिवशी त्यांची भूमिका असलेला ‘अल्लुरी सीताराम राजू’ चित्रपट इंट्रोड्यूस करण्यात आला होता. अलूरी सीताराम राजू चित्रपटाची कथादेखील भीमासारखीच आहे. अलूरी सीताराम राजू देखील तेलगू प्रांताचे आदिवासी नेते होते. त्यांनी आपले गाव सोडले आणि नंतर ब्रिटीश राजवटीविरूद्धच्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला होता.