काँग्रेसचे रावसाहेब दानवेंना उत्तर; अमर, अकबर, अँथनीच रॉर्बट शेठला पराभूत करतील


मुंबई – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील सरकार आम्हाला पाडायचे नाही, राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय असल्यामुळे त्यांचे तेच पडतील, असे विधान करत महाविकास आघाडीला टोला लगावला होता. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिला आहे. अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील, अशी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे.

आम्हाला महाराष्ट्रातील सरकार पाडायचे नाही. अमर, अकबर आणि अँथनीच राज्यात सरकार असून, या तिघांचे पायात पाय असल्यामुळे त्यांचे तेच पडतील, असे वक्तव्य केंद्रीय कृषी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले होते. दानवे यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिले आहे. अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील, असे म्हणत सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

रावसाहेब दानवे महाराष्ट्रातील सरकार आम्हाला पाडायचे नाही. अमर, अकबर आणि अँथनीच सरकार राज्यात असून, या तिघांचे पायात पाय असल्यामुळे त्यांचे तेच पडतील, असे म्हणाले होते. तसेच कृषी कायद्यावरूनही बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. छोट्या शेतकऱ्यांचे मोदी सरकारच्या कृषी कायद्यांमुळे कल्याण होणार असल्यानेच काँग्रेस या विधेयकांना विरोध करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन आमचे सरकार आल्यावर ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली होती. आता त्यांचे सरकार आले आहे, तर त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील दानवे यांनी केली होती.