अनलॉक 4 साठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शकतत्वे जाहीर


मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारकडून अनलॉक 4 साठी मार्गदर्शकतत्वे जारी करण्यात आल्या असून त्यानुसार मेट्रो सेवा सात सप्टेंबरपासून सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असल्यामुळे आता मुंबईतील मेट्रो सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर शाळा, महाविद्यालय 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. त्याचबरोबर हा लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.

त्याचबरोबर अनलॉक 4 साठी राज्य सरकारने देखील आपली मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. यात शाळा, कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच असणार आहेत. केवळ कंटेनमेंट झोन बाहेर 50 टक्के शिक्षक आणि स्टाफला ऑनलाईन वर्गासाठी शाळेत येण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच कंन्टेनमेंट झोन बाहेर जिल्हा, तालुका, शहर किंवा गावात यापुढे केंद्राशी चर्चेशिवाय लॉकडाऊन करता येणार नाही. देशात कुठेही व्यक्ती किंवा वाहन प्रवासासाठी आता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

असे आहेत अनलॉक 4 साठीची महत्वपूर्ण मार्गदर्शकतत्वे

  • देशातील रेल्वे सेवा 7 सप्टेंबरपासून सुरू होणार.
  • सोशल अॅकेडमिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना 21 सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली असली तरी यासाठी 100 लोकाचे बंधन असणार आहे.
  • ओपन एअर थिएटर्स 21 सप्टेंबरपासून उघडण्यास परवानगी.
  • 30 सप्टेंबर पर्यंत शाळा आणि महाविद्यालय बंदच राहणार.
  • शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी 9 वी ते 12वीचे विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात जाऊ शकतात. पण यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.
  • कंटेनमेंट झोनमधील चित्रपटगृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क आणि थिएटर्स बंदच राहणार आहेत. याठिकाणी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे.
  • त्याचबरोबर सध्या लग्न आणि अंत्यसंस्कार यासाठी असलेल्या माणसांची मर्यादा २० सप्टेंबर पर्यंत कायम राहील. २१ सप्टेंबर पासून १०० माणसांना परवानगी