शरद पवारांचा राहुल गांधींना बहुमूल्य सल्ला; मोदींवरील टीका थांबावा आणि पक्षाला सांभाळा


मुंबई : बुधवारी सीएनएन न्यूज 18 शी काँग्रेससह अधिक काळापर्यंत राजकारणाच्या मैदानात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खास बातचीत केली. त्यांचे काँग्रेसमधील अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, गांधीवाद हा काँग्रेससाठी एक मजबूत शक्ती आहे. यासह काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही त्यांनी सल्ला दिला. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करणे थांबवून, काँग्रेसचे काम सांभाळायला हवे.

पवार पुढे म्हणाले, काँग्रेसला मी अनेक वर्षांपासून बघत आलो आहे आणि यातून एक गोष्ट मला दिसून येते. कोणी याचा स्वीकार करेल किंवा नाही, काँग्रेससाठी गांधीवाद ही एक मोठी ताकद आहे. काँग्रेसला एकत्र आणण्यात सोनिया गांधी यशस्वी राहिल्या. आता राहुल गांधी यांचा स्विकार काँग्रेसवर विश्वास असणाऱ्यांनी केला आहे. मला वाटते की राहुल गांधींवर सर्वांनी पक्षाची पूर्ण जबाबदारी सोपवायला हवी. ते पुढे म्हणाले पक्षाचे शासन राहुल गांधी यांनी सांभाळणे महत्त्वपूर्ण आहेच आणि पक्षाच्या विविध नेत्यांशी चर्चा करणे गरजेचे असून त्यांनी पक्षातील नेत्यांशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांना एकत्र आणायला हवे, असे पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार ऑफिस कसे सांभाळायला हवे या प्रश्नावर म्हणाले, त्यांना देशाचा दौरा सुरू करायला हवा. त्यांनी प्रवास करावा. त्यानंतर मोदींविरुद्ध गांधींच्या ट्विटविषयी पवारांना विचारले असता, राहुल गांधींनी ट्विट केले होते की, मोदी आपली प्रतीमा तयार करण्यासाठी 100 टक्के लक्ष केंद्रीत करीत आहेत. भारतातील सर्व नियंत्रित संस्थाने या कामात व्यस्त आहेत. यावर शरद पवार यांनी राहुल गांधींना सल्ला दिला. ते म्हणाले, हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पण आपण पाहिले आहे की जेव्हा तुम्ही कोणा एका व्यक्तीला वैयक्तिक लक्ष्य करता तेव्हा आपली विश्वासार्हता कमी होत जाते आणि हेच नेमके राहुल गांधी यांनी करायला हवे.