राज्य सरकारचा निर्णय; उद्यापासून दुकाने सुरु ठेवण्यास दोन तासांची वाढ


मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्याचा निर्णय घेतला असून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत राज्यातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही खुली ठेवता येतील, असे आदेश काल मुख्य सचिवांनी काढले आहेत. ही संमती उद्या, गुरुवार 9 जुलैपासून देण्यात आली आहे. आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. यासंदर्भातील आदेश काल काढण्यात आले आहेत.

त्याचबरोबर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या क्षेत्रात मिशन बिगिन अगेन टप्पा 2 मध्ये मार्केट तसेच अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना पी वन – पी टू बेसीस वर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. हा नवा आदेश उद्या, 9 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे.

आठवड्यातील 7 दिवस मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमधील कंटेन्मेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील मार्केटना परवानगी देण्यात आली आहे. पी वन – पी टू बेसीसवर या क्षेत्रातील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या उर्वरित भागात मार्केट आणि दुकानांना आठवड्यातील सात दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास संमती देण्यात आली आहे.

सोशल डिस्टन्सिंग तसेच कोरोनासंदर्भात लॉकडाऊनच्या इतर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासनाकडून संबंधित दुकाने किंवा मार्केट बंद केली जातील. दुकाने किंवा मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या दोन तास वाढीव वेळेचा संबंधित मार्केट आणि दुकान मालक वापर करतील, राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment