देवेंद्र फडणवीस यांचे ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ पुस्तक


मुंबई – वाचकांसाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक पुस्तक उपलब्ध झाले असून या पुस्तकाचे ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ असे नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये केंद्राकडून राज्य सरकारला मिळालेल्या निधीचा लेखाजोखाच मांडला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा महाराष्ट्राला कसा लाभ होणार याचे सोप्या शब्दात यात विश्लेषण केले आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले की, ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ हे नवीन पुस्तक वाचकांपुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मराठी/हिंदी/इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोरोना काळात आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी समाजातील सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान जाहीर केले. त्याचा महाराष्ट्राला कसा लाभ होणार याचे सोप्या शब्दात या पुस्तकात विश्लेषण करण्यात आले आहे.


हे पुस्तक 36 पानांचे असून या पुस्तकाला शब्दरुपी शुभेच्छाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती होती.

Leave a Comment