जखमी जवानांच्या वडिलांचा राहुल गांधींना सल्ला; यामध्ये राजकारण करू नका


नवी दिल्ली – चीनच्या जवानांसोबत पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाल्या भारतामध्ये चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कोणाच्याही ताब्यात भारताची एकही इंच जमीन नाही तसेच भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले. तसेच कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करू नये आणि तसा प्रयत्न चीनने केला तर त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याचे मोदींनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले आहे.

सध्या देशातील राजकारण शहीद झालेल्या 20 जवानांच्या मृत्यूवरून तापले आहे. याच दरम्यान राहुल गांधी यांना राजकारण न करण्याचे आवाहन गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी केले आहे. भारतीय लष्कर सक्षम असून चीनचा ते पराभव करू शकतात. यामध्ये राहुल गांधी यांनी राजकारण करू नये. माझा मुलगा लष्करात देशासाठी लढला आणि यापुढेही लढत राहिल, असे जखमी जवानाच्या वडिलांनी म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Leave a Comment