यामुळे रुग्णांना मिळणार नाही कोरोना चाचणीचे रिपोर्ट; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती


मुंबई – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापुढे कोरोना चाचणीचा रिपोर्ट थेट रुग्णांना दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. राजेश टोपे यांनी यावेळी हा निर्णय घेण्यामागचे कारणही सांगितले. कोरोनाचा रिपोर्ट रुग्णांना दिल्यास कोणतीही लक्षणे नसलेली व्यक्ती देखील तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांना खासगी रुग्णालयात गरज नसताना ऑक्सिजन आणि आयसीयू दिले जाते. त्यामुळे इतर रुग्णांना जागा मिळत नाहीत. लक्षणे नसलेल्या लोकांना खाजगी रुग्णालये दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे हा निर्णय रुग्णांच्या हितासाठीच घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. खरंच बेडची गरज ज्या रुग्णांना आहे त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर राज्यभरातून रेमडेसेवीर आणि टोसीलोझुबामिन या दोन इंजेक्शनची मागणी होत असून याच्या पुरवठ्याची मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर आम्ही पंतप्रधानांकडे त्याची किंमतही कमी करावी अशी आमची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ही इंजेक्शन्स कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच राज्य सरकारचा हेतू स्वच्छ आहे. आम्हाला काहीही लपवायचे नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर दिले. ५०० व्हेंटिलेटरची मागणीही पंतप्रधनांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणीचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार हे दर २ हजार २०० आणि २ हजार ८०० एवढे दर केले आहेत. यापैकी पण जे फक्त नुमने थेट लॅबमध्ये जातात त्यासाठी २ हजार ८०० रुपये आकारले जातात आणि जर रुग्ण स्वतः चाचणीसाठी जात असतील तर २ हजार २०० रुपये घ्यावे, असे त्यांनी म्हटले. मुंबईत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही अशी तक्रार आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये ५ ते १० रुग्णवाहिका आम्ही ठेवत आहोत. तरी १९१६ किंवा वॉर्ड ऑफिसच्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिकेची मागणी करावी. खाजगी रुग्णवाहिकेची मागणी करू नये, असे आवाहन टोपे यांनी केले.

Leave a Comment