फडणवीसांच्या प्रत्येक मुद्द्यांना महाविकास आघाडीचे प्रतिउत्तर


मुंबई : महाराष्ट्राला केंद्रातील मोदी सरकारकडून आतापर्यंत किती मदत केली याची तपशीलवार माहिती काल देण्यात आली होती. त्यावर आज महाविकास आघाडीच्या सरकारकडून पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीचा खुलासा यावेळी करण्यात आला. देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारने भरघोस मदत देऊन महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत असल्याचा आभास निर्माण केल्याचे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यावेळी म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा खुलासा करण्यात आला. काल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पत्रकार परिषद घेतली. याला आम्ही आज प्रत्यक्षात उत्तर देत असल्याचे त्यांनी म्हटले.

महाविकास आघाडी सरकारच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • काल फडणवीसांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत गहू, तांदूळ, डाळ अशी केंद्राने मोठी मदत केली असे सांगितले. त्याचबरोबर १७५० कोटींचे गहू दिल्याचे त्यांनी सांगितले, पण एवढा गहू मिळालाच नाही.
  • तसेच स्थलांतरित मजुरांसाठी १२२ कोटी दिल्याचे त्यांनी सांगितले. पण अद्याप धान्य मिळाले नाही आणि मजूर आपल्या गावाला देखील पोहोचले आहेत.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ६००० देण्यात होते. ते आधीच सरकारला दिले होते. त्याचबरोबर विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना ११६ कोटी केंद्राने दिल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यातील १२१० कोटी राज्य सरकार देत हे त्यांनी सांगितले नाही.
  • ६०० श्रमिक ट्रेन सुटल्या. या सर्व ट्रेनचे पैसे ६८ कोटी रुपये राज्य सरकारने दिले. कुठल्याही श्रमिकाकडून पैसे घेतले नाहीत. ८० ट्रेन दिवसाला मागितल्या आणि ३०-३५ ट्रेन दिल्याचे आम्ही म्हटले होते. याचा त्यांना राग आला. आम्ही ४८ ट्रेनची मागणी केली पण त्यांनी एका दिवसात ४३ ट्रेन पाठवल्या. स्थलांतरित जाऊच नये आणि महाराष्ट्रातील सरकार बदनाम व्हावे हा केंद्राचा डाव आहे.
  • केंद्र सरकारकडून आम्ही ट्रेन पाठवतो पण महाराष्ट्र सरकार मजुरांना जाऊ देत नाही असा खोटा आरोप केला आहे. ट्रेनच्या वेळात उलटसुलट बदल केला. ट्रेन सुटण्याच्या आधी १ तास आधी कळवले जाते. त्यातच गुजरातला १५०० ट्रेन दिल्या पण मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्राला ७०० ट्रेन दिल्या.
  • त्याचबरोबर एप्रिल आणि मेचा ३० टक्के हक्काचे पैसे महाराष्ट्र सरकारला मिळणे बाकी आहेत.
  • देशाला जाणाऱ्या रिवेन्यूपैकी ३५ टक्के महाराष्ट्रातून जातो. इतर देशातील कामगार येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची व्यवस्थित काळजी घेत आहोत.
  • आजही ७ लाख जेवणाची ताट त्यांच्यापर्यंत पोहोचवली जातात. दीड-दोन महीने घरात राहील्याने मानसिक अवस्था बिकट झाली आहे. त्यांना त्यांच्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. त्यांच्या तिकिटाचा, जेवणाचा खर्च सरकार करत आहे.
  • कोरोनाचे संकट कमी झाले नाही. मुंबईची स्थिती काळजी घेण्यासारखी आहे. पण कोणाची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सहकार्याची अपेक्षा केली होती. पण त्यांनी सरकार कसे पडेल याकडेच लक्ष दिले. पण आमचे लक्ष महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्याकडे असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment