मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय; भाद्रपदऐवजी यंदा माघमध्ये साजरा करणार गणेशोत्सव


मुंबई – यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवादेखील कोरोना व्हायरसचा फटका बसणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. मुंबईतील श्रीमंत गणेशोत्सव मंडळ अशी ओळख असलेल्या वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ समितीने यंदाचा गणेशोत्सव भाद्रपदऐवजी फेब्रुवारी २०२१ मध्ये येणाऱ्या माघी गणेश जयंतीला करण्याचा निर्णय घेतला आहे. वडाळ्यातील श्रीराम मंदिर येथील जीएसबी मंडळाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना जीएसबी सार्वजनिक गणेश उत्सव समिती ट्रस्टचे सचिव मुकुंद कामत म्हणाले की, लवकरच देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या विळख्यापासून सुटका होईल असे वाटत नाही. लाखो भाविक गणेशत्सवात दर्शनासाठी गर्दी करतात. गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टसिंगचे नियम राखण्यासाठी, तेसच भाविकांच्या आरोग्याचा सुरक्षिततेसाठी माघ महिन्यात गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दरम्यान, वडाळा येथील जीएसबी गणेश उत्सव मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रूपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर एक लाख ५० हजार रुपये कोरोनाबाधितांचे बेड तयार करण्यासाठी दिले आहेत.

Leave a Comment