नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने चौथ्या टप्प्यात बऱ्याच प्रमाणात सवलत दिली आहे. त्यातच आता येत्या सोमवारपासून मर्यादीत मार्गांवर देशांतर्गत विमान सेवा सुरु होणार असून त्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आज काही मार्गदर्शकतत्वे जारी करण्यात आली आहेत. त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने हवाई प्रवासासाठी जारी केलेली मार्गदर्शकतत्वे
- प्रवाशांना विमान उड्डाणाच्या नियोजितवेळेच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचावे लागेल.
- प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्हज घालणे बंधनकारक असेल.
- पुढच्या चार तासांनी ज्यांचे विमान आहे, त्यांनाच फक्त टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश दिला जाईल.
- टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश देण्याआधी प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग चाचणी करण्यात येईल.
- १४ वर्ष वयोगटाच्या आतील मुलांसाठी आरोग्य सेतू अॅप बंधनकारक नाही. ज्यांच्या अॅपवर हिरवे चिन्ह येणार नाही, त्यांना विमानतळावर प्रवेश मिळणार नाही.
- ट्रॉलीचा वापर शक्यतो टाळण्याचा प्रयत्न असेल. पण विनंती केल्यास ट्रॉली उपलब्ध करुन दिली जाऊ शकते.
- टर्मिनलमध्ये प्रवेश करण्याआधी सामानाचे सॅनिटायझेशन केले जाईल.
- काऊंटरवरील स्टाफला फेस शिल्ड घालावे लागेल किंवा काचेमध्ये रहाणे आवश्यक आहे.
- सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांबद्दल सातत्याने घोषणा केल्या जातील.
- एअरपोर्ट स्टाफला पीपीई किट बंधनकारक आहे तसेच कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सॅनिटायझर ठेवावे लागेल.