१९ मे पासून देशांतर्गत एअर इंडियाची विशेष भरारी


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये अनेक नागरिक अडकून पडले आहेत. दरम्यान केंद्राने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात परप्रांतीय मजूरांसाठी श्रमिक ट्रेन्स सुरु केल्यानंतर आता सरकार विमान कंपनी असलेली एअर इंडिया १९ मेपासून दोन जूनपर्यंत देशांतर्गत विशेष विमाने सोडणार आहे. ही विशेष विमाने लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतता यावे, यासाठी देशाच्या वेगवेगळया शहरांदरम्यान उड्डाण करतील.

देशातील लॉकडाउनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होईल. त्यातच काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातील नियम पूर्णपणे नवीन असतील असे जाहीर केले. या हवाई प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटाचे पैसे भरावे लागणार असून पण अद्याप यासाठी बुकिंग सुरु झालेले नाही. दिल्लीहून १७३, मुंबईहून ४०, हैदराबादहून २५ आणि कोचीहून १२ विमाने उड्डाण करतील. दिल्लीहून जयपूर, बंगळुरु, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ या शहरांमध्ये विमाने सोडण्यात येतील. मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद आणि विजयवाडा या शहरांमध्ये विशेष विमाने सोडण्यात येतील.

Leave a Comment