१२ मेपासून धावणार निवडक रेल्वेगाड्या; असे करता येणार तिकीट बुक


मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून 12 मेपासून म्हणजेच उद्यापासून १५ जाणाऱ्या आणि १५ येणाऱ्या निवडक रेल्वेगाड्या सामान्य प्रवासी वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्चाची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून या निवडक रेल्वेगाड्यांच्या तिकिटांसाठी केवळ ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असून, या गाड्यांचे तिकीट रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटरवर मिळणार नाही. म्हणजे केवळ आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. त्यातही कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. पण यावेळी प्रवाशांना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.

रेल्वेची प्रवासी वाहतूक तब्बल दीड महिन्यानंतर सुरू होणार असून नवी दिल्ली स्टेशन, आगरतला, होवराह, पाटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगलुरू, चेन्नई, तिरूअनंतपूरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या स्थानकादरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या रेल्वे चालणार आहेत.

परराज्यातील मजूर, कामगार सध्या आपआपल्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातील मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल. या संदर्भातील शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाने काढला आहे.

आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर रेल्वेचे तिकिट मिळणार असून ११ मे म्हणजेच आज सायंकाळी चार वाजता ही ऑनलाईन तिकिट विक्री असून सुरू होणार आहे. रेल्वे स्थानकावर तिकिट मिळणार नाही. कन्फर्म तिकिटधारकांनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाईल. तोंडाला मास्क लावण बंधनकारक असणार आहे. दरम्यान, प्रवासी किंवा लोकांनी कुठल्याही रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, असे आवाहन भारतीय रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment