लॉकडाऊनमध्ये दारू विक्रिला परवानगी दिल्यानंतर दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागत आहे. दुकानांबाहेर गर्दी होत असल्य सोशल डिस्टेंसिंगचे पालन होताना दिसत नाही. याच पार्श्वभुमीवर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दारूसाठी रांगा लावणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात इम्तियाज जलील यांनी ट्विट केले की, औरंगाबादमध्ये एकही दारूचे दुकान उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सरकारला विनंती आहे की दारूसाठी रांगा लावणाऱ्याचे रेशन कार्ड रद्द करण्यात यावे. त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या रेशनची गरज नाही. जर ते दारू खरेदी करू शकतात, तर धान्य देखील खरेदी करू शकतात. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाची लाज वाटते.
We were appreciating good work of CM Udhavji but all gone waste now. Straight charge huge money exchanged hands from powerful liquor lobby. Why MPs/ MLAs in other red zones allowing this game of death. Perhaps they too may be ‘bevdas.’
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) May 4, 2020
आपल्या आणखी एका ट्विटमध्ये जलील म्हणाले की, आम्ही उद्धवजींच्या कामाचे कौतूक करतो, मात्र हे सर्व वाया गेले आहे. रेड झोनमधील आमदार, खासदार जिवाशी का खेळत आहेत. कदाचित ते देखील बेवडे असतील.
Finally my stand has been proved right by not allowing liquor shops to open in aurangabad.Mumbai now has realised what I had realised before only.Don’t know how much more damage has been caused in these 2 days when we saw mockery of social distancing at liquor shops across state!
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) May 5, 2020
मुंबईमध्ये दारूची दुकाने उघडल्यानंतर लॉकडाऊनच्या नियमांचे तीन तेरा वाजल्यावर सरकारने पुन्हा ही दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. यावर माझी दुकाने बंद ठेवण्याची भूमिका योग्य ठरल्याचे देखील जलील म्हणाले.