राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात ७२९ ची भर; एकूण आकडा ९ हजारांवर


मुंबई – सध्या देशासोबतच राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. काल एका दिवसात राज्यात ७२९ नवे रुग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. कोरोनाग्रस्तांचा केवळ मुंबईतील आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे ३९३ नवे रुग्ण सापडले. तर मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत ४२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, १०६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

काल एका दिवसात धारावीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले. आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार काल मुंबईतील ४३१ कोरोना संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. तर सोमवारी केवळ मुंबईत कोरोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी सोमवारी मुंबईत कोरोनाचे ३९५ नवे रुग्ण सापडले होते.

१ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण धारावी परिसरात समोर आला होता. तर या ठिकाणी सोमवारी कोरोनाचे १३ नवे रुग्ण समोर आले होते. राज्यात मंगळवारी कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे १०६ रुग्णांना उपचारानंतर मंगळवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात १ हजार २८८ रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी ३१ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. कोरोनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment