मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रामध्ये महाराष्ट्राचे रुतलेले अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील,असे म्हटले आहे. राज यांनी या पत्रामधून प्रामुख्याने सामान्यांची गरज लक्षात घेता हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील मागणी केली आहे. ट्विटवरुन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्राचे फोटो राज ठाकरे यांनी ट्विट केले आहेत.
महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल, अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय घ्यावेच लागतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं जाहीर आवाहन.#CoronaVirusInMaharashtra #EconomicCrisis #FightAgainstCovid19 #RevenueGenerationForState #Economics #लढाकोरोनाशी @CMOMaharashtra pic.twitter.com/Fvx3N2hXYW
— Raj Thackeray (@RajThackeray) April 23, 2020
राज ठाकरेंनी काय म्हटले आहे पत्रात