1.13 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही वाढीव महागाई भत्ता


नवी दिल्ली : अनेक देशांची आर्थिक व्यवस्था कोरोना व्हायरसमुळे पूर्णपणे विस्कटली असून कोरोनाशी लढण्यासाठी भारत देखील सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण कोरोनामुळे काही घटकांना फटका बसणे सुरुच आहे. केंद्र सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance DA) देण्याचा निर्णय थांबवण्यात आला आहे. केंद्र सरकारने आता जानेवारी महिन्यापासून थकित असणारा हा वाढीव भत्ता देण्यावर निर्बंध लावले आहेत. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आलेला महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 17 टक्क्यांवरून महागाई भत्ता 21 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. पण आता 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2020पासून वाढणारा महागाई भत्ता थांबवण्यात आला आहे.

देशाच्या महसुलावर कोरोना व्हायरसमुळे मोठा परिणाम झाला असल्यामुळे हा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. पण केंद्राचे 54 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांवर सरकारच्या आताच्या निर्णयाचा परिणाम होणार आहे. हा निर्णय बुधवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

4 टक्क्यांनी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा वाढवण्यात आलेला महागाई भत्ता थांबवल्याने सरकारचे दर महिन्याला सुमारे 1000 कोटी रूपये वाचतील. सरकारकडून महागाई भत्ता वाढवण्यासाठी अतिरिक्त 14,595 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. 21 एप्रिल पासून अंशत: काही गोष्टी सुरू देखील करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment