10 हजारांच्या पार देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा, तर आतापर्यंत 339 मृत्यू


नवी दिल्ली : देशात वाढलेल्या जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊनच्या कालावधीत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत वाढ केली असली तरी देखील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत देशात 10363 लोकांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 1036 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर या जीवघेण्या कोरोनाने 339 जणांचा जीव घेतला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसून येत असून महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्यूदर देखील सर्वाधिक आहे.

याबाबत आरोग्य मंत्रालयाने दिलल्या माहिती नुसार, महाराष्ट्र 149, मध्य प्रदेश 43, गुजरात 26, पंजाब 11, दिल्ली 24, तमिळनाडु 11, तेलंगणा 16, आंध्र प्रदेश 7, कर्नाटक 6, पश्चिम बंगाल 7, जम्मू-काश्मीर 4, उत्तर प्रदेश 5, हरियाणा 3, राजस्थान 3, केरळ 3, झारखंड 2, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश आणि ओडिशा मध्ये प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन करण्यात आले. जिल्हा पातळीवर या काळात केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. देशातील कोरोना प्रभावित अशा 15 राज्यांतील 24 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा पॉझिटिव्हचा एकही रुग्ण समोर आला नाही. यात महाराष्ट्रातील, छत्तीसगडमधील दुर्ग आणि बिलासपुर, केरळातील वायनाड, मणिपुरमधील इंफाळ पश्चिम आणि बिहारमधील पाटना या राज्यांचा समावेश आहे.

देशातील प्रत्येक राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंची लॉकडाऊनच्या काळात पूर्तता करण्यासाठी सरकारने मालवाहतूक सुरु ठेवली होती. तसेच जीवनावश्यक वस्तूंसेबधीत सर्व औद्योगिक उद्योग सुरु ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment